बातमीपत्र

केरळमधील पूरग्रस्तांसाठी जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते किर्तीभाई शहा यांचा पुढाकार

 प्रतिनिधी
केरळमध्ये गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे महापुर आल्याने केरळमध्ये सर्वाधिक हानी झाली आहे. तेथील जनजीवन विस्कळित झाले आहे. मुसळधार पाऊस आणि महापुरात आतापर्यंत  334, जणांचा मृत्यू झाला आहे. एकूण आठ हजार कोटीहून अधिक नुकसान झाले आहे. हजारो नागरिक पुरात अडकले आहेत.अडीच लाखांवर नागरिक अक्षरशः  बेघर झाले आहेत.
या दुदैवी प्रसंगात आम्ही  सर्व भांडुपकर आमच्या बांधवांसोबत आहोत.
भांडुप मधील जनतेला आम्ही नम्र पणे आवाहन करतो की, कपडे, खाद्य पदार्थ, धान्य,  ब्लँकेट,चादर, साधनसामुग्री, औषधसाठा, आर्थिक मदत, अत्यावश्यक बाबींचा विचार करून जे जे शक्य होईल ती योग्यती यथाशक्ती मदत करण्याचे मौलिक कामगिरी आपण सर्वांनी पार पाडून आपल्या भारतीय बांधवांना मदतीचा हात पुढे क रुया असे आवाहन किर्तीभाई शहा यांनी केले आहे.

Follow Us On Social Media 
Web Site : -  www.livemaharashtra.com 
Download LIve Maharashtra App From Google Play store 
 
आपल्या सर्वांच्या सामाजिक,राजकीय आणि सत्य बातम्याचा लक्षवेधी आढावा व प्रत्येक अनुचित घडणाऱ्या घटना आपल्या समोर मांडणारी एकमेव मराठी वृत्तवाहिनी Live महाराष्ट्र.  
पाहत राहा Live महाराष्ट्र - हाक तुमची !! साथ आमची !!


साप्ताहिक बातम्या

आमच्यात सामील व्हा